विवाहबाह्य संबंध आणि आपण
आजच्या अनेक समस्यांमध्ये गंभीर स्वरूपाची समस्या म्हणजे आजकाल चालणारे एक्सट्रा मॅरिटल अफेअर्स, ज्याला आपण विवाहबाह्य संबंध म्हणतो. लोकांकडे पैसा आहे, सो कॉल्ड स्टेटस आहे परंतु एकमेकांमध्ये असणारी हार्मनी, सुसंवाद नाहीत. वरवर सुखी असल्याचे दाखवणारे नवरा-बायको अंतर्गत कलहाने त्रासलेले असतात कारण त्यांच्या नात्यामधला विश्वास नाहीसा झालेला व त्याचे मूळ कारण म्हणजे लाइफ पार्ट्नरचे अफेअर. अफेअर्स का होतात हा मोठा प्रश्न आहे. मुळात आपल्या भारतीय संस्कृतीत ह्याला मान्यता नाही. विशेष म्हणजे आजकाल ह्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. मग पूर्वीच्या काळी ह्या गोष्टी नव्हत्या का ? काळ पुढे सरकला तरी स्री व पुरूष तेच आहेत, त्यांच्या शरीराची रचनाही तीच आहे, भावनाही तशाच आहेत मग असे का घडते? अर्थात ह्या गोष्टीमागे अनेक कारणे आहेत. पूर्वीच्या काळातील स्त्रियांचे वास्तव्य जास्तीत जास्त घरातच असायचे. परंतु आताची स्त्री ही नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडायला लागलीये, विचार बदलले, कामानिमित्त पुरुषांबरोबरचा सहवास वाढला त्यामुळे ह्या गोष्टी घडायला सुरूवात झाली. पुर्वी स्त्रियांना नवरा आवडला, नाही आव...